कलम 370, राम मंदिर, तिहेरी तलाकनंतर आता समान नागरिक कायदा? जाणून घ्या काय आहे हा कायदा
कलम 370, राम मंदिर, तिहेरी तलाकनंतर आता समान नागरिक कायदा? जाणून घ्या काय आहे हा कायदा समान नागरिक कायदा म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकासाठी कोणताही धर्म असो वा जातीचा विचार न करता समान कायदा 11-February-2020 12:31 PM by AM News Network Article 370, Ram temple, equal civil law now after triple divorce? Learn what this law is स्पेशल डेस्क । समान नागरिक कायद्याबद्दलच्या चर्चेला देशात पुन्हा एकदा उधान आले आहे. याला सामान्य नागरी संहिता किंवा एकसमान नागरी संहिता म्हणून देखील ओळखले जाते. मोदी सरकारने तीन तलाक रद्द, कलम 370 काढणे आणि राम मंदिरासंबंधी निर्णय आल्यानंतर, आता बर्याच लोकांना असे वाटते की भाजपा सरकार समान नागरी कायद्याचे आपले वचन पूर्ण करेल आणि त्यासाठी संसदेत कायदा आणेल. समान नागरिक कायदा म्हणजे काय? समान नागरिक कायदा म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकासाठी कोणताही धर्म असो वा जातीचा विचार न करता समान कायदा. सध्या देशात वेगवेगळ्या धर्मांकरिता वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झाल्यावर प्रत्येक धर्मासाठी समान कायदा येईल. सर्व हिंद...